झटपट क्रिकेट म्हणजेच सर्वच श्रेणीत लोकप्रिय ठरलेल्या t20
सामान्य पासून अनेक दिवस दूर असलेल्या भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा व दमदार फलंदाज विराट कोहली या दोघांचेही t 20 सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन झाले आहे त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना आनंद झाला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी- २० मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी- २० फॉरमॅटमध्ये पुनरागमन झाले आहे. तर, विराट कोहलीही पुन्हा एकदा भारतीय संघातून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या दोन्ही खेळाडूंना अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत स्थान देण्यात आले आहे.