स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चे पडघम वाजले असून त्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.ज्यात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी संघटनात्मक पक्ष बांधनिसाठी पूर्ण जिल्हा पालथा घातला. सदस्य नोंदणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून ही बाब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी महत्वाची ठरणार आहे.लाडकी बहिन किसान सन्मान योजना पीक विमा कामगारांना दिल्या जाणाऱ्या योजना यामुळे शिवसेना भाजप तालुक्यात मुसंडी मारू शकते.
सहकार क्षेत्रातील मोठे नाव व सोज्वळ नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते मनीष पाटील देहाने काँग्रेस च्या कार्यक्रमात दिसत असले तरी मनाने त्यांचे समर्थक काँग्रेस पासून दुरावलेले दिसतात. मनीष पाटीलयांच्या वरील अविश्वास नाट्य अजूनही समर्थक विसरायला तयार नाहीत. यांना स्व.लोक नेते उत्तमराव पाटील ,यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात तर आहेच पण आर्णी तालुक्यात देखील आहे.दुसरी कडे विधानसभा निवडणुकीत एक मोठा गट काँग्रेस सोडून गेल्याने त्यांचा फायदा साहजिक च शिवसेना भाजप ला होईल असे चित्र आहे किंग मकर साजिद बेग,जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विकास पाटील राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत पाटील यांनीही काँग्रेसपासून फारकत घेतली आहे. सावळी भागात चांगले नेतृत्व समजले जाणारे अहमद तंवर यांनी काँग्रेस पासून अंतर राखले आहे त्यामुळे काँग्रेसला वाटते तेव्हढे गणित नक्कीच सोपे नाही असे बोलले जाते.