7k Network

घरकुल लाभार्थ्यांसाठी खुश खबर,उपलब्ध होणार रेती,तहसीलदार वाहुरवाघ यांचा निर्णय,पंचायत समिती कडे करावा लागणार अर्ज

आर्णी तालुक्यातील रेती घाट लिलाव न झाल्याने गावागावात मंजूर झालेले प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत चे घरकुल रेती अभावी रखडले असून चढ्या दराने व न परवडणारी रेती विकत घेऊन घरकुल बांधकाम न परवडणारे आहे.

या प्रकारामुळे घरकुल बांधकाम रखडले  ही बाब लक्षात घेऊन आर्णी चे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी एक निर्णय घेतला असून त्यामुळे घरकुल धारकांना ही बाब  दिलासा देणारी आहे.

घरकुल धारकांनी आपले रेती मिळवण्यासाठी चे अर्ज पंचायत समिती कडे द्यावे त्यानुसार त्यांना घरकुला साठी रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामुळे आज जरी विविध रेती घाटा वर चिखल असला तरी चार दिवसाची उघडीप मिळाली तर प्रश्न निकाली निघू शकतो पण मग पावसाळ्यात मात्र अनेक गरीब घरकुल धारकांना मनस्ताप व त्रास सहन करावा लागू शकतो.तूर्तास आर्णी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आनंद व्यक्त केल्या जातो.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!