7k Network

शेतकऱ्यांना फोडत आहेत घाम,प्रशासन मात्र त्याच्या पाठीशी ठाम

आसरा गावातील ग्रामस्थ व शेतकरी सध्या गावच्या महिला पटवारी व कृषी सहायक यांच्या त्रासाला कंटाळले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की आसरा येथील पटवारी वर्षाताई शेंडे व कृषी सहायक प्रवीण राठोड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले असूनत्यांच्या मनमानी कारभारास कंटाळून या दोघांची गावातून तात्काळ बदली करावी असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.वास्तविक पटवारी व कृषी सेवक हा गावचा व प्रामुख्याने शेतकऱ्यांचा आत्मा असतो.पण या लोकांनी आपली जवाबदारी योग्य रीतीने पार पडली नाही तरआधीच मेठाकुटीस आलेल्या बळीराजाला त्रस्त होण्याची वेळ आली आहे. यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध आहे.

शेतकऱ्यांना शासकीय अनुदाना पासून शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना डावलून हेराफेरी करून सधन व नुकसान न झालेल्यांना मोबदला मिळवून देण्याचा गैरप्रकार हे दोघे कर्मचारी करत आहेत जर निवेदनाची दखल न घेतल्यास क्सिनाक १ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण   करण्याचा इशारा आसरा गावातील शेतकऱ्यांनी दिला आहे. स्थानिक प्रशासन मात्र या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!