२०२४ ची विधानसभा निवडणूक ही काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी न लढवता आपल्या पुत्रास मैदानात उतरविले तेव्हा आर्णी च्या राजकारणात काँग्रेस मध्ये प्रचंड नाराजी उफाळून आली मात्र पक्ष श्रेष्ठींनी युवा नेते जितेंद्र मोघे यांच्यावर विश्वास टाकला.या विधानसभा निवडणुकीत पहिलीच सार्वजनिक निवडणूक लढविणार्या जितेंद्र मोघे यांनी लक्षणीय मते घेतली
म्हणतात ना की अपयश ही यशाची पायरी असते.निवडणुकीतील पराभव हा अंतिम न मानता जितेंद्र मोघे यांनी वडील शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले त्यात मतदारसंघातील रुग्ण सेवा व आर्णी तालुक्यातील दाभडी येथून निघालेली विराट शेतकरी आत्म सन्मान पद यात्रा आर्णी च्या सहकार्यांना घेऊन यशस्वी केली.या यात्रेतील नियोजन व सहभाग पाहून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचेही त्यांनी लक्ष वेधले.
अनुभव नाही,नवखा म्हणणाऱ्या पक्षातल्या व विरोधातल्या सर्वांचे आवाज बंद करणारा एक पहिला विजय तोही सहकार क्षेत्रात जितेंद्र मोघे यांच्या नेतृत्वात मिळवला.निवडणूक होती पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती ची या निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी एकता पॅनल तयार करण्यात आले. विरोधात विद्यमान आमदार राजू तोडसाम,लोकनेते म्हणून प्रसिद्ध माजी आमदार अण्णा साहेब पारवेकर,कधी काळी काँग्रेस चे असलेले माजी नगराध्यक्ष शंकर बडे आदींचे पॅनल होते.
मात्र १७ जागे साठी झालेल्या निवडणुकीत १६ ठिकाणी काँग्रेस पुरस्कृत पॅनल ने दणदणीत विजय मिळवला. एका ठिकाणी अपक्ष निवडून आला.
यावेळी जुनेच साथीदार असलेले सलीम खेतानी काँग्रेस च्या सोबतीला होते.सलीम खेतानी हे काही कारणास्तव काँग्रेस पासून दूर गेले होते.राजकारणात त्यांचा दबदबा आहे. गरीब गरजू लोकांना ते मदत करतात म्हणून सलीम खेतानी यांची इमेज आहे.आता भविष्यात सलीम खेतानी व काँग्रेस एकत्र राहिल्यास पांढरकवडा नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती देखील या गटाला सोप्या जातील