7k Network

किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी संजीवनी:ना.संजय भाऊ राठोड

किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठी संजीवनी…आहे असे प्रतिपादन यवतमाळ चे पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी केले ते

 यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विभागाच्या वतीने किसान सन्मान निधीच्या २० व्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.  तेव्हा बोलत होते.या ऐतिहासिक क्षणाचे थेट प्रक्षेपण यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्रात (KVK) आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या योजनेमार्फत देशभरातील ९ कोटी ७० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून २०,५०० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल २,९३,९७७ पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. पालकमंत्री म्हणून हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असून, या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होण्याची संधी आज मला लाभली.

यावेळी कृषी विभागाच्या ‘कृषीसंवादिनी’ या पुस्तिकेचे वाटप माझ्या हस्ते करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून पाहणी केली.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, पश्चिम विदर्भ, प्रभारी विभागीय समन्वयक परागभाऊ पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाभरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (KVK यवतमाळ) दीपक कच्छवे, सहयोगी अधिष्ठाता श्रीमती गहरवाल यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!