नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संपुर्ण राज्यात फिरून केंद्र सरकार व राज्य सरकार वर टिके ची झोड उठवत आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील माजी आमदार असलेले व काँग्रेस च्या राजीव गांधी पंचायत राज समिती मध्ये राष्ट्रीय पातळीवर अध्यक्ष म्हणून काम करणारे सपकाळ अचानक काँग्रेस चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झाले तेव्हा पासून त्यांनी संघटन वाढी सोबत केंद्रातील भाजप सरकार वर राज्यातील भाजप सरकार वर टीकेची झोड उठवली होती
आर्णी त्यांनी शेतकरी आत्म सन्मान यात्रा काढली जरूर त्या यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला व येथून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली.ही बातमी ताजी असतांना महायुती च्या घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काँग्रेस ला मोठा धक्का दिला.
खामगाव चे तीन टर्म आमदार असलेले दिलीप कुमार सानंदा यांनी कॉंग्रेला राम राम करत हात सोडला आहे.दिलीप कुमार सानंदा ये बडे प्रस्थ असून त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभावित होतील.एका पाठोपाठ एक माजी आमदार कॉंग्रेसला सोडून जात असल्याने सपकाळ यांच्या विषयी नाराजी पुढे येत आहे.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील माजी राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी काँग्रेस पक्षाला राम राम केला.आता दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडली
काँग्रेस ने आर्णीत मोठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढली होती या पडयात्रेला विदर्भातील सर्वच खासदार मंडळी आमंत्रित होती.मात्र केवळ मतदार संघ असल्याने खा.प्रतिभा ताई धानोरकर ह्याच उपस्थित होत्या. मात्र अन्य तीन खासदार आले नाही त्यावरून सपकाळ यांच्या विरुद्ध वातावरण तयार तर केल्या जात नाही ना असा प्रश्न निर्माण होतो.