राज्य सरकारने म्हणजेच देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास मंत्री प्राचार्य अशोक उईके व महा युती सरकारने अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापणेचा घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय असून त्यामुळे आदिवासी समाजा ला मिळणारा न्याय जलद गतीने मिळेल शिवाय आदिवासींच्या शिक्षण आरोग्य व मूलभूत हक्क व न्याय जलदगतीने मिळेल असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार प्रा.राजू भाऊ तोडसाम यांनी आभार देखील व्यक्त केले.
अनेक आदिवासी समाज संघटना त्यांचे नेते यांच्या संयुक्त प्रदीर्घ लढ्यास मिळालेले हे यश असल्याचे मत प्रा.आमदार राजू भाऊ तोडसाम यांनी व्यक्त केले
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक निर्णय मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व आदिवासी विकास मंत्री मा.श्री.डॉ. अशोकजी उईके साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची निर्मीती दिनांक ३ जुन २०२५ रोजी करण्यात आली. हा निर्णय म्हणजे भाजप सरकारच्या सबका साथ-सबका विकास या वचनाचा आदिवासी समाजासाठी पुर्तता करणारा टप्पा ठरणार आहे.
या आयोगाच्या स्थापनेमुळे अनुसूचित जमातीच्या समाजातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, जमीन, पाणी, रहिवासी आणि योजनांची अंमलबजावणी यासारख्या क्षेत्रातील अडचनीचा मागोवा घेऊन ठोस उपाययोजना राबवता येणार आहे.असे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले.
या आयोगाच्या माध्यमातुन आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांची अंमलबजावणी करण्यास महत्वपूर्ण ठरेल असेही तोडसाम यावेळी म्हणाले.यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे व दत्तर मान्यवर उपस्थित होते.