पराग पिंगळे हे सामाजिक संवेदनता जपत सामाजिक उपक्रम राबवणारे एका हळव्या मनाचे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत असे गौरउद्गार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी काढले.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी पराग भाऊ पिंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आज यवतमाळ येथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख परागभाऊ पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच “माय माऊलींची वारी, श्रींच्या दारी” या उपक्रमांचे उद्घाटन करून ना.संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
परागभाऊ आणि व्यासपीठावरील आम्ही अनेकजण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. असे सांगून ना.संजय राठोड म्हणाले की, आजही आम्ही राजकारणात असलो तरी समाजसेवा हेच आमचं प्राधान्य आहे असे या प्रसंगी ना.संजय भाऊ राठोड म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे “माणूस द्या मज, माणूस द्या”, त्या प्रमाणे समाजात चांगली माणसं पुढे यायला हवीत, लोकांची सेवा व्हायला हवी, अन्यायाविरोधात लढायला हवं हेच परागभाऊ निष्ठेने करत आहेत. पुढे बोलतांना ना.संजय भाऊ राठोड म्हणाले की
“परागभाऊ हे केवळ राजकारणी नाही, तर संवेदनशील मनाचे कवी, लेखक आणि अभ्यासक आहेत”. त्यांच्या माध्यमातून यवतमाळ शिवसेनेची सामाजिक बांधिलकीची वाटचाल अधिक बळकट झाली आहे. त्यांना जनसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा मन:पूर्वक शुभेच्छा ना.संजय भाऊ राठोड यांनी दिल्या
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, गजानन इंगोले, प्रविण निमोदीया, भाऊराव ढवळे, बाळासाहेब दौलतकर, फिरोज पठान, आकाश चव्हाण, उद्धवराव साबळे, निलेश बेलोकर, वैशालीताई बेलोकर, प्रांजलीताई पिंगळे, कल्पना शिवणकर, डॉ. डोंगरवार, रमेश अग्रवाल, गजानन डोमाळे, संजय रेंगे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.