शिवसेनेतून आपले ४० सहकारी घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री होणाऱ्या एक नाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव व पक्ष चिन्ह देखील मिळवले अडीच वर्षे धडाक्यात काम करून अनेक योजना राबविल्या त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरली.२०२४ ला पुन्हा सत्तेत आले यावेळी त्यांच्या सोबत गेलेले ३९ आमदार पुन्हा निवडून आले.
एकनाथ शिंदे शिवसेना सोडून गेल्यावर त्यांच्यवर प्रचंड टीका केल्या गेली. पन्नास खोके,एकदम ओके अशा घोषणा देऊन गद्दार अशी उपमा उबाठा खासदार संजय राऊत यांनी दिली पण या सर्व बाबी कडे दुर्लक्षच करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीकडे लक्ष दिले.
नगरसेवक माजी आमदार माजी पदाधिकारी यांना शिवसेनेत आणले.
अक्कलकोटचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये त्यांनी हा प्रवेश केला. मध्यप्रदेशच्या लोकांनीही आपल्याला शिंदेंसाहेबांसोबत जा असं सांगितलं, त्यामुळेच शिवसेनेत जाण्याचं निश्चित केल्याचं सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितलं. तसेच तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असल्याचं शिंदे आपल्याला म्हणाले असंही त्यांनी सांगितलं.
जिल्हात आमचे एकमेव घराणे आहे ज्याने कधीच पक्ष बदलला नव्हता. ही स्वामींची नगरी, स्वामी देखील म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच मला एकनाथ शिंदे म्हणाले, “भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे”. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता, त्यामुळे मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता. पण ते सोडून साहेब आमच्यासाठी आलेत. 1957 पासून आम्ही काँग्रेस सोबत होतो. विधानसभा निवडणुकीत मला एक लाख लोकांनी मतदान केलं. त्यानंतर मी राज्यभर चौकशी केली, मध्य प्रदेशच्या लोकांनीही मला शिंदेंसोबत जायला सांगितलं. उज्जैन महाकालेश्वरला आमचे लोक गेले होते. तिथं त्यांनी अनेकांना विचारलं. तेव्हा त्यांनाही सांगितलं गेलं की शिंदेसाहेबांसोबत जा.