आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव नजरे समोर दिसत असल्याने काँग्रेस बिथरली असून त्यामुळेच शेतकरी प्रश्नावर पद यात्रा काढून शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचे काम काँग्रेस करत आहे.आता काँग्रेस कडे काही शिल्लक नाही विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराजया ने काँग्रेस अजूनही सावरली नाही.
लोकसभा निवडणुकीत संविधाना च्या नावावर फेक निराटीव्ह पसरून जागा जिंकल्या पण सत्ता मिळाली नाही तो प्रयोग शेतकऱ्यांना कळून चुकला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महा युती सरकारने पाच वर्षे मोफत कृषी वीज बिल करण्याचं निर्णय केला. हा निर्णय काँग्रेस च्या जिव्हारी लागला सोबत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी दिला त्यात राज्य सरकार देखील सन्मान निधी देत आहे.१ रुपयात पीकविमा म्हणजे काँग्रेसला नाकर्तेपणा ची आठवण देणे आहे.
आर्णी तालुक्यात २००० सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या.सौर उर्जे मुळे २४ तास दिवसा विज मिळणार आहे केंद्रातील भाजप प्रणित सरकार व राज्यातील महा युती चे सरकार सर्वोतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे उगीच काँग्रेसने दिशाभूल करू नये.असं मत आर्णी केळापूर चे आमदार प्राध्यापक राजू भाऊ तोडसाम यांनी करून काँग्रेस च्या पद यात्रेवर जोरदार टीका केली.
बोल महाराष्ट्र सोबत बोलतांना ते म्हणाले की स्वामिनाथन आयोग स्थापन करण्याची तारीख सांगावी व त्यातील एकही शिफारस त्यांच्या सरकार ने का मान्य केल्या नाहीत.राज्यात शेतकऱ्या वर गोळी झाडली तेव्हा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होते असा सवाल देखील आमदार राजू भाऊ तोडसाम यांनी केला.