मुका जीव प्राणी जर त्यावर जीव लावला तर तेही माणसा वर तेव्हढाच जीव लावतात मानवी भावना समजणारे अनेक पशु पक्षी असतात.त्यात काही पाळीव प्राणी असतात ज्यात प्रामुख्याने कुत्रा मांजर यांचा व गाई म्हशी बैल असे प्राणी असतात जेव्हढे प्रेम माणूस प्राण्यावर करतो तितकेच प्रेम प्राणी देखील माणसावर करतात.
वन्य प्राणी कायद्याच्या नुसार आता हत्ती,उंट,मोर,वाघ सिंहा स कृत्रिम अधिवासात बंदिस्त ठेवता येत नाही. पोपट ससा यांनाही पाळता येत नाही
पण अनेक धार्मिक परंपरा जपण्यासाठी आजही अनेक धार्मिक स्थळी हत्ती पाळल्या जातात त्याच्या वरून देवांची पालखी काढल्या जाते.
28 जुलैला कोल्हापूरपासून साधारण 35 किलोमीटर असलेल्या नांदणी गावात जे घडलं, ते क्वचितच इतर कोणत्या गावात कधी घडलं असेल, वा तुम्ही ऐकलं असेल. जवळपास सगळं गाव रस्त्यावर आलं होतं. हेच गाव कशाला, भोवतालच्या पंचक्रोशीतले लोकही जमेल तसं आले होते.
सगळे भावूक होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका ‘महादेवी’ नावाच्या हत्तीणीला दिला जात होता. कारण ती गुजरातच्या ‘वनतारा’ या संगोपन केंद्रामध्ये चालली होती.
नांदणी गावची ही ‘महादेवी’ हत्तीण आता गुजरातमधील वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं, वनतारा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पण ‘महादेवी’ आणि गावकऱ्यांच्या ताटातुटीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.
खरंतर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील. पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळेल. निरोपावेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या, तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या.
28 जुलैला कोल्हापूरपासून साधारण 35 किलोमीटर असलेल्या नांदणी गावात जे घडलं, ते क्वचितच इतर कोणत्या गावात कधी घडलं असेल, वा तुम्ही ऐकलं असेल. जवळपास सगळं गाव रस्त्यावर आलं होतं. हेच गाव कशाला, भोवतालच्या पंचक्रोशीतले लोकही जमेल तसं आले होते.
सगळे भावूक होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. हा एक निरोपाचा कार्यक्रम होता आणि तो निरोप एका ‘महादेवी’ नावाच्या हत्तीणीला दिला जात होता. कारण ती गुजरातच्या ‘वनतारा’ या संगोपन केंद्रामध्ये चालली होती.
नांदणी गावची ही ‘महादेवी’ हत्तीण आता गुजरातमधील वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं, वनतारा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पण ‘महादेवी’ आणि गावकऱ्यांच्या ताटातुटीचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.
खरंतर माणूस आणि प्राण्यांच्या नात्यांच्या अनेक गोष्टी आपण पूर्वी ऐकल्या असतील. पण अशी गोष्ट कदाचित पहिल्यांदाच ऐकायला मिळेल. निरोपावेळच्या या भावना केवळ ताटातुटीच्या नव्हत्या, तर त्या संघर्षातूनही आल्या होत्या.
ही गोष्ट आहे शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावाची आणि या गावच्या ‘महादेवी’ हत्तीणीची. तिला काही जण ‘माधुरी’ही म्हणायचे. 1992 सालापासून ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला होती.
पण, आता एक मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर या ‘महादेवी’ हत्तीणीला 33 वर्षांपासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं.
वन्यप्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला.
त्यानुसार या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या अंबानींच्या ‘रिलायन्स फाऊंडेशन’ च्या ‘वनतारा’ या संगोपन केंद्रात जावं लागलं.
कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वनविभाग आणि ‘वनतारा’च्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन ‘वनतारा’चाच भाग असणाऱ्या ‘राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’च्या अखत्यारित दिलं.
‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’चं नांदणीशी असलेलं नातं
शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा ‘स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ’ आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमाभागातल्या 743 गावांतले भाविक या मठाशी जोडले गेले आहेत. या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा असते.
या मठाकडे ‘महादेवी’ हत्तीणीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिकाकर्ते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. इथल्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये हत्तीचा कायम सहभाग वर्षानुवर्षं राहिला आहे असं या मठाचं म्हणणं आहे.
सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलं की, “जवळपास १३०० वर्षांपासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे. इथं कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते.”
हे केवळ निरोपावेळेसच झालं असं नाही, तर त्याअगोदर काही दिवस 16 जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरुद्ध निकाल आला, तेव्हाही झालं. या हत्तीणीला लगेचच गुजरातला नेत आहेत अशी बातमी पसरली आणि आजूबाजूच्या गावातले शेकडो लोक रस्त्यावर आले.
त्यांना ‘महादेवी’ला घेऊन जाणारा रस्ता अडवायचा होता. या हत्तीणीशी जोडली गेलेली अशी ही प्रेमाची आणि त्यातून आलेल्या रागाची भावना होती.
वातावरण इतकं तापलं की राजकीय नेत्यांनाही यात पडावं लागलं, आणि काही नेत्यांनी मौन पत्करणंही पसंत केलं.
“ही अनेक वर्षांची परंपरा होती. इथं कधीही हत्तीला अगोदरही त्रास झाला नाही. लोकांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या आहेत. असं असतांना आपल्याला हत्ती मिळत नाही म्हणून कायद्याचा धाक दाखवून तो अशा प्रकारे घेऊन जाणं बरोबर नाही,” अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
कायद्याची लढाई आणि ‘वनतारा’ची एन्ट्री
चालू परंपरेनुसार ‘महादेवी’ ऊर्फ ‘माधुरी’ही हत्तीण नांदणीच्या मठात असतांना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020 च्या आसपास सुरु झाला.
वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणा-या ‘पेटा’ (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्यप्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील ‘उच्चाधिकार समिती’कडे केली.
मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, “डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकार समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला ‘वनतारा’चाच भाग असणाऱ्या ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ कडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं.”
एप्रिल २०२४ मध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधाअत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची याचिका दाखल करुन घेत न्यायालयानं या हत्तीणीला गुजरातला हलवण्याला स्थगिती दिली.
त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ज्ञ समिती, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासण्या, पाहणी सुरू राहिली. मठाचा दावा आहे की, या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या हत्तीणीची तब्येत सुधारत असल्याचे आणि ‘हेल्थ सर्टिफिकेट’ वेळोवेळी समिती आणि न्यायालयासमोर दाखल केली आहेत.
मात्र, 16 जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदणीच्या मठाच्या ट्रस्टची ही याचिका निकाली काढत 3 जून 2025 रोजी उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याच्या निर्णय कायम ठेवला.
त्यानुसार ‘महादेवी’ला ‘वनतारा’चा भाग असलेल्या ‘राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ कडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला.
‘स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठा’च्या ट्रस्टनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिथंही त्यांच्या हाती यश आलं नाही.
28 जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातला अंबानींच्या ‘वनतारा’त नेण्यात आलं.
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ’ ट्रस्टचे विश्वस्त सागर शंभूशेटे विचारतात की, “हे 1300 वर्षं प्राचीन मठसंस्थान आहे. हत्ती सांभाळायची परंपरा 400 वर्षांपासून आहे. ही हत्तीण 33 वर्षांपासून इथं आहे. गेली अनेक वर्षं चांगले पशुवैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ हत्तीकडे लक्ष देत होते. कोणताच प्रश्न नव्हता.
जेव्हा उच्चाधिकार समितीनं सांगितल्यानुसार वेगवेगळ्या पाहण्या झाल्या, त्यांनीही जे सुचवलं, ते आम्ही केलं. पण तरीही असा निर्णय आला. आम्ही कायदा पाळणारे आहोत. पण एकाच खाजगी ट्रस्टकडे हा हत्ती देण्यात आला? महाराष्ट्राची ही वनसंपत्ती होती, ती वाचवण्यासाठी महाराष्ट्रानं काही का नाही केलं?”
दुसरीकडे ‘पेटा’ संस्थेनं, ज्यांच्या मूळ तक्रारीवर ‘महादेवी’ या हत्तीणीचा ताबा नांदणीच्या मठाकडून काढून घेऊन ‘वनतारा’ कडे देण्यात आला, त्यांनी या हस्तांतरणानंतर काढलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे की, या हत्तीणीला ज्या अवस्थेत ठेवण्यात आलं होतं ती भयानक होती आणि आता तिची सुटका झाली आहे.
“‘महादेवी’ला जवळपास 33 वर्षांपासून या संस्थानाच्या मठात जणू कैदेत ठेवण्यात आलं होतं. काँक्रिटच्या जमिनीवर तिला साखळदंडांनी बांधण्यात यायचं आणि त्यामुळे तिची तब्येत खालावली होती,” ‘पेटा’च्या या पत्रकात म्हटलं आहे.
‘पेटा’नं या पत्रकार असंही म्हटलं आहे की जेव्हा ते या हस्तांतरणासाठी नांदणी गावात गेले होते तेव्हा त्यांच्या चमूवर दगडफेकही झाली.
” ‘महादेवी’ ही एकटी साखळ्यांमध्ये 33 वर्षं एकटी राहिली. त्यामुळे तिला संधीवात झाला आणि दुखणंही वाढलं. आम्हाला जरी त्रास झाला तरीही जो त्रास अनेक दशकं ‘महादेवी’नं सहन केला त्याच्या तुलनेत तो काहीच नाही.
‘महादेवी’ आता ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ इथं पोहोचली असून तिला तिथं योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल,” असं या पत्रकात पुढेही म्हटलं आहे.
नांदणी इथल्या मठाच्या ट्रस्टला मात्र ही निरिक्षणं मान्य नाहीत. त्यांना घडून आलेल्या एकूण प्रक्रियेबद्दलही शंका आहेत.
“1992 साली हा हत्ती मठात आल्यावर त्याचं कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केलं आहे. त्यानुसार आवश्यक सुविधा तिथं आहे. तसं असतांना या तक्रारीवर एवढ्या वेगात निर्णय आणि कारवाई होते कशी? हे संशयास्पद आहे आणि ते सगळं आम्ही सर्चोच्च न्यायालयातही मांडलं होतं.
प्रश्न हाही आहे की केवळ ‘वनतारा’लाच का हा हत्ती देण्यात आला? दुसरी कोणती जागा का सुचवण्यात आली नाही? जामनगरमध्ये या हत्तीला आवश्यक असं वातावरण, सुविधा आहेत का, हे तपासलं का, असे प्रश्न आहेतच,” न्यायालयात नांदणीच्या मठाची बाजू मांडणारे ॲडव्होकेट आनंद लांडगे ‘बीबीसी मराठी’शी बोलतांना सांगतात.
नांदणीच्या मठाकडून ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ला या हत्तीणीला हस्तांतरित करण्याची जबाबदारी वनविभागाकडे होती.
“मी न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलू शकत नाही. उच्च न्यायालयाच्या मूळ आदेशात या हत्तीणीला ‘राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट’ला हस्तांतरित करण्याचे आम्हाला आदेश होते.
दोन आठवड्यांची मुदत त्यासाठी होती. त्यानुसार आवश्यकत ते परवाने घेऊन, वाहतुकीची व्यवस्था करुन या हत्तीणीला जामनगर इथं पोहोचवण्यात आलं आहे,” असं त्यांनी सांगितले कोल्हापूर विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी हे सांगितलं.
वनतारामध्ये ‘महादेवी’चं आगमन
‘महादेवी’ हत्तीण वनतारामध्ये सुरक्षितपणे पोहचली असल्याचं वनतारा प्रशासनाकडून सोशल मीडियाद्वारे सांगण्यात आलं आहे.
इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माधुरी (महादेवी) आता वनतारा येथे सुरक्षितपणे पोहोचली आहे आणि तिथल्या वातावरणात स्थिरस्थावर होत आहे. तिच्या आसपास तिची काळजी घेण्यासाठी, देखभाल करण्यासाठी वनताराचं पशुवैद्यकीय पथक आहे. तिच्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्काळ आणि दीर्घकालीन वैद्यकीय गरजांची हे पशुवैद्यकीय पथक काळजी घेत आहे.”